अखेर राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा : आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाला यश

 

लोकदर्शन 👉. मोहन भारती

राजुरा :– आयटीआय चे महासंचालक यांनी विद्यार्थ्यांचे निकाल १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी १० वाजता जाहीर केला. मात्र तत्पूर्वी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ही पुढील प्रवेशाची अंतिम तारीख होती. त्यामुळे राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान ही बाब आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांच्याशी संपर्क साधून सदर प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात यावी अशी मागणी केली.
अखेर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांनी सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन आयटीआय प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवीली. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थी आयटीआय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेत त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *