राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट )आयोजित दहीहंडी फोडण्याचा मान मोरया साई गोविंदा पथक कुंडेगावं कोळीवाडाने पटकविला. ♦️उत्तम आयोजन नियोजन असल्याने विविध गोविंदा पथकांनी मानले आयोजकांचे आभार.

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २७ ऑगस्ट उरण शहरात व उरण ग्रामीण भागात गोपाळकाला सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. असून अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. उरण शहरात एन आय हायस्कूलच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) तर्फे भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी म्होत्सवाला न भूतो न भविष्यती अशी मोठया प्रमाणात गोविंदा पथकाची गर्दी पहायला मिळाली.उत्तम आयोजन व उत्तम नियोजन असल्यामुळे उरण तालुक्यातील तसेच पनवेल, नवी मुंबई मधील विविध गोविंदा पथकांनी सलामी दिली.व आलेल्या प्रत्येक गोविंदा पथकाने सदर कार्यक्रमाच्या उत्तम आयोजन व नियोजनाचे कौतुक केले. सदर दहीहंडी फोडण्याचा मान उरण तालुक्यातील नवघर येथील कुंडेगाव कोळीवाडा गावातील मोरया साई गोविंदा पथकाने पटकाविला.वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त उरण मधील आदर्श शेतकरी प्रकाश ठाकूर यांना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले .यावेळी प्रसिद्ध उद्योगपती राजाशेठ खारपाटील, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, शेकापचे युवा नेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, उद्योगपती राजेश शेठ पंजवाणी आदी मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन कार्यक्रमाचे उत्तम नियोजनाचे कौतुक केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला जनतेचा, नागरिकांचा, गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त व उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष समद भोंबले, संदेश म्हात्रे, उरण तालुका सरचिटणीस दिनेश पाटील, शहर युवा अध्यक्ष अमर घरत,घारापुरी अध्यक्ष त्रिकाळ पाटील, सनी म्हात्रे, अमित साहू आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. एकंदरीतच सदर दहीहंडी उत्सव मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *